शुक्रवार, ८ जानेवारी, २०१६

भारतीय भाषा मरणोन्मुखशय्येवर, लेखांक 2

     भारतीय भाषा (मराठी, हिंदी आदी ) मरणोन्मुखशय्येवर  

लेखांक:2
तन्मय पाटील
   
               एका अक्षराचा एकच उच्चार आणि एका उच्चारास एकच अक्षर हे लिपी शुद्धीचे गमक आहे.
      :- स्वातंत्र्यवीर सावरकर   
             
                देवनागरी हि भारतात वापरली जाणारी पौराणिक लिपी पध्दत आहे . संस्कृत आणि त्यातून उत्पन्न झालेल्या सर्व भाषा ह्या देवनागरी लिपीतच लिहल्या जात असतात.(हिंदी मराठी गुजराती ...आदी.) परंतु मुस्लिम राजवटीच्या काळात अरबी आणि पर्शियन भाषेतील काही शब्दांचा संस्कृतनिष्ठ हिंदी भाषेत प्रवेश झाला आणि उर्दूची उत्पत्ती झाली. हिंदी भाषेत म्लेंछ बाधित अरेबीयक शब्द घुसवून अरेबियन लिपीत लिहली जाणारी दुषित भाषा म्हणजे उर्दू . पुढील काळात  पोर्तुगीज, डच, इंग्रज आदी; युरोपियन राष्ट्र भारतात आली . आणि रोमन (इंग्लिश) लिपीचा भारतात प्रवेश झाला. 
              परंतु आज भारतात इंग्रजी लिपीचा वापर मोठ्याप्रमाणात केला जात आहे . सर्व ठिकाणी लावण्यात येणारे फलक हे इंग्रजी लिपीतच लिहिलेले आढळतात तसेच औद्योगिक क्षेत्रात व्यवहारासाठी इंग्रजी लिपीचाच वापर होतो . परंतु प्रतेक्षात मात्र उपयोगात आणण्यासाठी आपली देवनागरी लिपी श्रेष्ठ आहे . कारण देवनागरी लिपीत एका अक्षराचा उच्चार एकच होत . उदा:- जर आपण “क” हे अक्षर लिहले त्याचा उच्चार “क” असाच होतो आणि जर आपण “स” हे अक्षर लिहले तर त्याचा उच्चार “स” असाच होतो . ह्या उलट इंग्रजी भाषेत CINEMA(सिनेमा) ह्या शब्दासाठी “c” ह्या अक्षराचा उच्चार “स” असा होतो . तर CAT(कॅट) ह्या शब्दासाठी “c” ह्या अक्षराचा उच्चार “क” असा होतो .  देवनागरीत “अ” ह्या अक्षराचाचा उच्चार “अ” तसेच “आ” ह्या अक्षराचा उच्चार “आ” असा होतो. ह्या उलट इंग्रजीतील A ह्या अक्षराचा उच्चार कधी अ, कधी आ, तर कधी अॅ असा कसाही होत असतो. 
    देवनागरीत एका शब्द उच्चारण्यासाठी जितके अक्षर वापरले जातात लिहण्यासाठीही तेवढेच अक्षर  वापरण्यात येतात. ह्या उलट इंग्रजी लिपीत त्याच ४ अक्षराच्या शब्दासाठी ८ ते १० अक्षर लिहावी लागतात . उदा: कमिशन हा शब्द  बोलताना आपण चार अक्षरचा उच्चार करतो. तसेच कमिशन लिहतानाही देवनागरीत चार अक्षरच लिहतो, इंग्रजीत मात्र (cammission) ४ अक्षरांनाच्या शब्दासाठी १० अक्षर लिहावी लागतात. “क्ष” हे देवनागरीलिपीतील तील एक अक्षर  लिहण्यासाठी इंग्रजी लिपीत “ksh” तीन अक्षर  लिहावी लागतात म्हणून  क्षितिज हे तीन नाव इंग्रजी लिपीत लिहायचे असल्यास (kshitij) तीन एवजी सात अक्षर खर्ची होतात. हाच फरक आहे युरोपियन आणि भारतीय लिपीमध्ये. देवनागरीत आपण जेवढी अक्षर बोलतो तेवढीच आणि तीच  लिहावी लागतात. म्हणून देवनागरी लिपी इतर लिपी पद्धतीपेक्षा शास्त्रीयदृष्ट्या उच्च आणि श्रेष्ठ  दर्ज्याची आहे तसेच जागतिक व्यवहारात उपयोगात आणण्यासाठी अनुकरणीय आणि सोयीस्कर आहे.
  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा